मंगळवार, १० मार्च, २०१५

उन्हाळा आणि आपल्ये सौंदर्य!

उन्हाळा आणि आपल्ये  सौंदर्य!
उन्हाळा आणि सौंदर्य! साठी प्रतिमा परिणाम
उन्हाळा म्हणलं की सर्वसाधारणपणे ज्यांची त्वचा गोरी आहे अशांनीच काळजी घ्यायला हवी असा एक जनरल गैरसमज आढळतो. उन्हाच्या तीव्र झळांमुळे केवळ रंगच नव्हे तर त्वचेचा पोत खराब होणे, सावळी त्वचा रापणे, घाम-अस्वच्छतेमुळे त्वचेच्या रंध्रांमध्ये इन्फेक्शन होणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर अकालीच चुण्या-wrinkles पडणे या समस्याही सर्वांना होऊ शकतात. त्वचेची काळजी हा स्त्रीपुरुषांसाठी कॉमन फॅक्टर असल्याने सर्वांनीच त्वचेची काळजी विशेषत: उन्हाळ्यात घ्यायला हवी. "हॅsss आपल्याला नाय काय फरक पडत, उन्हातान्हातुन फिरलो तरी" असं म्हणुन फुशारक्या मारणारी मंडळी मग जेव्हा अकाली वृध्द दिसु लागली की मग हे क्रिम लाव ते लोशन लाव असले प्रकार करताना दिसतात. समवयस्कांमध्ये आपण तरुण, फ्रेश दिसायला हवंच असं तुम्हाला वाटत असेल तर काळजी नक्की घ्या. त्यासाठी अजुन काही टिप्स...
 उन्हापासून बचा
 
 http://prahaar.in/wp-content/uploads/2012/08/lady1.jpg
उन्हात बाहेर जाणे गरजेचे असेल तर सन स्क्रीन लोशन लावून बाहेर पडायला पाहिजे व छत्रीचा वापर करावा. ऊन आणि प्रदूषणामुळे केसांचे आरोग्य फारच खराब होते म्हणून केसांना बांधूनच बाहेर जाणे योग्य.
   



  काही खास उपाय : केसांसाठी

उन्हाळा आणि सौंदर्य! साठी प्रतिमा परिणाम
केसांसाठी : केसांचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी प्रत्येक 15 दिवसांनी मेंदी लावायला पाहिजे. मेंदी कंडिशनरचे काम करेल. त्याशिवाय आठवड्यातून किमान एकदा अंडे आणि दह्याचा वापर केला पाहिजे.
1 वाटी मेंदीत आवळा, शिकाकाई, रिठा, मेथी, कडू लिंब, तुळशीचे पानं सर्वांना 1-1 चमचा घेऊन दह्यात मिसळावे, त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून केसांना लावून 1 तास तसेच राहू द्यावे, याने केस मजबूत होतील व केसांना चमक येईल.

थोडं गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने केसांना धुऊन टाकावे. कोरड्या केसांमध्ये वेगळीच चमक येऊन ते मऊ होतील. . , लिंबाचा रस आणि दही या तिघांना सम मात्रेत घेऊन केसांचे मसाज करून डोकं धुवायला पाहिजे. सर्वात शेवटी केसांना लिंबाच्या पाण्याने फाइनल रिंस करावे.

 कडक उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल? 

 उन्हाळा आणि सौंदर्य! साठी प्रतिमा परिणाम

१) आपली त्वचेत अनेक सुक्ष्म रंध्रे ( छिद्रे) असतात. तुमची त्वचा जितकी स्वच्छ, मोकळी असेल clean असेल तेवढे त्वचेचे आरोग्य उत्तम. स्त्रीयांनी उन्हाळ्यात शक्यतो गडद मेक-अप करणे टाळावे. मेक-अपमुळे त्वचेची रंध्रे ही बंद होत असल्याने त्वचेला एक विचित्र कोरडेपणा येतो. दिर्घकाळ रंध्रे बंद राहीली तर, एखाद्या बंदिस्त खोलीप्रमाणे त्वचेचीही घुसमट होते, व पोत बिघडायला सुरुवात होते. मेक-अप केल्यानंतर, फंक्शनहुन परतल्यावर आळस टाळुन तो आठवणीने काढायला हवा. क्लिन्झर्स लावुन मेक-अप काढुन त्वचा स्वच्छ धुवुन मग साधे मॉईश्चरायझर लावुन ठेवा
२) दिवसातुन किमान चार वेळा थंड पाण्याने अलगदपणे चेहरा-मानेच्या त्वचेवर हबकारे मारल्याने त्वचा टवटवीत होते, त्यानंतर मऊ कापडाने किंवा टॉवेलने ती हलकेच टिपुन घ्यावी, खसाखसा चोळु नये.
३) आठवड्यातुन एकदा तासभर वेळ काढुन वस्त्रगाळ चंदन पावडर २ चमचे, गुलाबपाणी ३ चमचे आणि चमचाभर मुलतानी मिट्टी यांचे एकत्र मिश्रण करुन त्याने फेशिअल घरच्या घरी केलंत तरी त्वचेचा पोत सुधारुन चेहरा फ्रेश होतो. पंधरा दिवसांतुन एकदा तरी उत्तम मसाज क्रिम आणुन त्वचेला घरच्या घरी व्यवस्थितपणे मसाज करणे खुपच चांगले. मसाजमुळे त्वचेखालचे रक्तसंचालन उत्तम रहाते. मसाज हलक्या हाताने गोलाकार ( circular clockwise) करावा
४) कडक उन्हाचे त्वचेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे फक्त पिकलेल्या टॉमेटोचा गर काढुन त्याने संपुर्ण चेहरा, मान, हात यावर एक हलकासा थर देऊन पंधरा मिनिटांनी तो स्वच्छ धुवुन टाकला तरी त्वचेचे रापणे ( टॅनिंग) कमी होते
५) उन्हाळ्यात जंकफुड, मसालेदार पदार्थ, मद्यपान टाळणे. मांसाहार करत असाल तर तो अगदी माफक प्रमाणात करणे, आहारात अधिकाधिक द्रवपदार्थांचा समावेश केल्यानेही खुप फरक पडतो. उन्हाळ्यात दुधी, पालक, कोबी, टॉमेटो यांचे सेवन हितकर असुन. द्रवपदार्थांत ताक, लिंबुपाणी, पन्हे, कोकम सरबत, आवळा सरबत अशा क्षुधानाशक द्रव्यांचे सेवन हे त्वचेबरोबर आरोग्यासही अत्यंत लाभदायक आहे.
६) शक्य असेल तर दुपारी १२ ते ४ यावेळात घराबाहेर पडणेच टाळावे. दुपारचा आहार माफक असावा (सध्या आंब्यांचा सिझन असल्याने ते शक्य नाही पण तरीही आहारावर किंचित मर्यादा असु देणे) उन्हाळ्यत नैसर्गिक रित्याच पचनयंत्रणा मंद होत असल्याने जडान्न, अतीगोड पदार्थ, मिठाया, मटनासारखे जड अन्न यांच अतिरेक टाळावा. कोल्ड्रिंगने तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होतो असं माझं मत आहे. त्यात कार्बनडायॉस्काईडचे प्रमाण जास्त असल्याने जठरातील पचनास आवश्यक असणारा प्राणवायु कमी होतो व एकंदरीतच यकृत, आतडे यांची कार्यक्षमता मंदावते. प्रत्येक शीतपेयात साखरेचे प्रमाण अवास्तव असल्याने त्याचा इतर अवयवांवरही परिणाम होतो
७) सध्या सनस्क्रिन किंवा सनब्लोक क्रिम चांगली उपलब्ध आहेत त्यातील ज्यांचा SPF (Sun protection factor) किमान १५ आहे अशी क्रिम्स वापरणे केव्हाही उत्तम.
८) परमेश्वराने किंवा निसर्गाने प्रत्येकाला एक छान त्वचा दिलेली आहे. तिची काळजी घेणे. ऋतुंनुसार तिच्या आरोग्यास जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, तरच तुम्ही दीर्घकाळपर्यंत तरुण दिसु शकता. उत्तम त्वचेच्या व्याखेत रंग हा मुद्दा सर्वस्वी नसुन त्वचेचा दर्जा, चकचकीतपणा, स्वच्छता, पोत हे घटकही आंतर्भुत आहेत, त्यांची जपणुक प्रत्येकाने मनापासुन करावी
९) उन्हाळ्यात चेहरा ताजातवाना राखण्यासाठी दोन चमचे बेसन, हळद, गुलाब पाणी व मध घालून त्याचा लेप बनवून चेहरा, हात-पाय आणि मानेवर लावून 10 मिनिटाने धुऊन टाका. त्याने त्वचा सुंदर व स्वस्थ बनेल
.

१०) डोळ्यांची आग व 'डार्क सर्कल' कमी करण्यासाठी रात्री झोपताना डोळ्यांवर थंड दुधाच्या पट्ट्या ठेवाव्या.

११) ओठांना सुंदर व मऊ बनविण्यासाठी रात्री झोपताना दुधाची साय लावायला पाहिजे, सकाळी थंड पाण्याने धुऊन टाकावे.

१२) दुधात हळद घालून त्याची पेस्ट तयार करावी, या पेस्टला चेहरा आणि हाता-पायावर लावावे. 10 मिनिटाने धुऊन टाकावे.

१३) 8-10 दिवसाने एकदा चेहऱ्यावर वाफ जरूर द्यावी. या पाण्यात पुदिनाची पानं, तुळशीचे पानं, लिंबाचा रस व मीठ घालावे. वाफ घेतल्यानंतर याच कोमट पाण्यात 5 मिनिट हात ठेवावे त्याने हातसुद्धा मऊ होतात.
.... काळजी घ्या, सुंदर दिसा, छान रहा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा