महत्वाच्या किचन टिप्स :
- गोड व तिखट पदार्थ तळताना तेल व तूप समप्रमाणात एकत्र करून तळावेत. त्याने पदार्थ कोरडा होऊन पोटाला त्रास होत नाही.
- टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर शिळे होऊन मऊ झाले असल्यास मिठाच्या पाण्यात रात्रभर बुडवून ठेवावे, म्हणजे पुन्हा टवटवीत होतील.
- शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यात ठेवून काढावेत. भाजल्यावर खमंग व हलके होतात.
- मीठदाणीत मीठ नेहमी चिटकत असते. झाकण लावण्याआधी त्यात तीन-चार दाणे तांदुळाचे टाकावे म्हणजे चिटकत नाही.
- आईस ट्रेमध्ये पाण्यासोबत कॉफी पावडर टाकायला पाहिजे, कारण कोल्ड कॉफीत आईस क्यूब टाकल्याने कॉफी जास्त चवदार लागते.
- स्वयंपाकघरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी त्यात दिवा व एग्जॉस्ट फॅन लावायला पाहिजे. त्याने आतील हवा बाहेर जाऊ शकते.
- करवंदाला चीक असतो, तो जाण्याकरिता पाण्यात थोडे मीठ घालून त्यात करवंदे बुडवून ठेवावीत. चीक सुटून करवंदे स्वच्छ होतात.
- पदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण तो फ्रीज अर्थात शीतकपाटात ठेवत असतो. 'स्मार्ट वूमन' फ्रीजमध्ये जास्त दिवस पदार्थ ठेवत नाहीत
- साखरेच्या डब्याला हमखास मुंग्या लागतात. या डब्यात तीन-चार लवंगा ठेवा. मुंग्या साखरेपासून लांबच राहतील.
- मसाल्यात हिंगाचा खडा ठेवल्याने मसाला अधिक काळ टिकतो.
- एखाद्या पदार्थात चुकून मीठ जास्त झालं, तर साल काढलेला बटाटा त्यात टाका. अधिकचं मीठ बटाटा शोषून घेईल.
- नाक, तोंडावर कपडा बांधून स्वयंपाकघराची स्वच्छता केल्याने धुळीचे कण शरीरापर्यंत पोहचत नाहीत.
- कुकिंग गॅसला सिरका किंवा मीठाच्या पाण्याचे साफ करावे. म्हणजे ते चमकतील आणि तिथे किडेही राहत नाही
- आरसा पुसण्यासाठी एअर फ्रेशनरचा वापर करा. यामुळे आरशावरचे डाग सहज निघतील, तसंच छान सुगंधही वातावरणात पसरेल.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा